मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३७३भले भणवितां संतांचे सेवक

गाथा अभंग ३७३

भले म्हणविता संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥

ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥

पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥२॥

तुका म्हणे बरे सांगतां चि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडे तों ॥३॥

अर्थ :- आपण जर स्वतःला संतांचेसेवक म्हणावले तर त्यांच्या ज्ञानाची, तपाची, संचिताची शिदोरि आपोआप आपल्याकडे चालत येते ।।1।।

कोणतीही गोष्टी ओरिणामकाराक घडवून येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्यात थोडी जरी चूक झाली तर नाश होतो ।।2।।

पाकशुद्धी करण्यासाठी सर्व पदार्थ व्यवस्तीत व प्रमाणात असावे लागतात, त्यातून जेवण रुजकर बनेले तरच ती पाकशुद्धी सफल होते ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात , जो पर्यंत रणभूमी दिसत नाही तो पर्यंतच युद्धकथा गोड वाटतात ।।4।।

रामकृष्णहरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा