गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

४०३तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो

गौळणी

गाथा अभंग ४०३

तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो ।

तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥

सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी ।

जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी ॥ध्रु.॥

भावें गेलें म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग ।

तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥२॥

काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें ।

नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥३॥

काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठ‍ ऐसा निर्गुण ।

आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण ॥४॥

इतुकियावरी म्हणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना ।

आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥५॥

अर्थ :- देवाचे ते बोल एकूण सत्यभामा म्हणते,  देवा , एका. तुम्ही स्वताचा लौकिक सांगा किव्हा चांगले म्हणा. जर आपली दृष्ट सर्वत्र सामान आहे, तर अशी वंचना का होते? तर हे तुमचे सारे सोंग आहे आणि त्याचे संपादन करणे तुम्ही अगदी चांगल्या प्रकार जानता ।।1।।

असे कृत्य करुण तुम्ही मला आजपर्यंत फसविले ।।ध्रु।।

हे देवा, तुमचा कधीही वियोग होवू नये म्हणून भावपूर्वतेने मी तुमच्याकडे आले. पूर्वजन्मी माझी अशी इच्छा होती, की उत्तरजन्मात आपली साथ-संगत लाभावी; पण तुम्ही मला जगाला पारखे केले. तुम्ही असे कराल असे तुमचे ढंग काय मी जानत होते ? ।।2।।

त्यंकरिता मला इतके दुःख सोसावे लागले. देवाची अशी कृती मला ठाऊक नव्हती का? कारण 'व्यभिचार' म्हणून त्याची ख्यातिच् आहे ।।3।।

तुमचे गुन किती म्हणून सांगावे! तुमच्या संबंधाने वाचा फूटत नाही;  कारण तुम्ही निर्गुण व निष्ठुर आहात. तुमच्याकडे आपले-परके, आई-बहिन असे काही नाते नाही. सासवा-सुनाचे भांडण लावून देतात व ते पाहत बसता! ।।4।।

सत्यभामेचे अशा प्रकारचे बोलने एकूण वैकुंठाधिपति भगवान म्हणतात, जे काही पूर्वी होऊन गेले ते पुन्हा मनात आणु नये. आता मात्र मी तसे करणार नाही, अगदी शपत घेवून सांगतो. भक्तावर दया करणारा देव असे म्हणाला, असे तुकारामबंधू म्हणतात ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा