गौळणी
गाथा अभंग ४०४
कान्हो एकली रे एकली रे । तुजसवें चुकलें रे । भय वाटे वनीं मज अबळा धाकली रे ॥१॥
निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥२॥
पिकल्या बोरी जालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥३॥
आड खुंट जालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥४॥
तुका म्हणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥५॥
अर्थ :- अरे श्री कृष्ण, मी एकटी आहे. तुझ्यापाशि चुकीची वागले. मी अजान, अबला आहे ।।1।।
घरातून बाहर पड़ताना माझे आइबाबा मला विरोध करत होते; तरीही मी तुझ्याबरोबर का आले ? ।।ध्रु।।
कृष्ण लबाड़ आहे, असे लोक सांगत होते, तरी तुझ्या सहवासाला मी चटावाले ।।2।।
पिकालेले पोरिचे झाड़ पाहुन त्याची फळे घेण्यासाठी मी तिकडे गेले. इतक्यात, हरी कोठे गेला,ते काही कळेना ।।3।।
लाकडाचे खूंट, वेलिंच्या जाळ्या समोर आल्या तेव्हा कृष्णने ही कसली चेष्टा मांडली ते कळेना ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, संत ज्या वाटेने हरिकडे गेले, त्याच वातेन आपण जाऊ. म्हणजे पायात (सुख-दुःखरूपी) काटे मोडनार नाहीत व आपण सुखाने हरिचे दर्शन घेवू ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा