गौळणी
गाथा अभंग ३७५
एकली राणागोविंदा सवें । गेलें ठावें तें जालें ॥१॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥
नव्हती देखिली म्यां वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥
भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥३॥
सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥४॥
आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥५॥
तुका म्हणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥६॥
अर्थ :- मी गोविंदाबरोबर एकटिच राणात गेल्याचे कळाले. म्हणून तुम्ही मला 'शिंदळी' म्हणू नका, असे परोपरिणे मी तुम्हाला सांगते ।।1।।
कारण गोविंद आणि मी हा भेदच आमच्यात नाही ।।ध्रु।।
ब्रह्मस्वरूप शेताची वाट मला ठाऊक नव्हती . एकटिने जान्याचे भय मला वाटत होते. म्हणून तो गोविंद-धीट, सगुन पुरुषं पाहुन त्याच्या संगतिने मी उपासना करत गेले ।।2।।
राणातील कामक्रोधरूपी पशुच्या , तसेच जन्ममृत्युच्या भीतीने मी त्याच्या गळ्यात मीठी मारली व त्याच्याजावळ सुखाच्या शैय्यावर मी लपून राहिले ।।3।।
त्याने माझ्या चित्तरूपी स्तनाला हात लावला, असे तुम्ही महानता पण ते कृत्य त्याने केवळ थट्टमस्करिने केले आणि विरोध करुण मी ते सहन केले ।।4।।
मी विवाहित, सवाष्ण स्त्री आहे. मग मी गरोधर आहे याचे कारण सांगावे लागते काय? ।।5।।
तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकार गौळणींनी लोकांच्या आरोपाचे खंडन केले व प्रपंच तसेच परमार्थ तडीला लावला ।।6।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा