गाथा अभंग ३६७
करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥
आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥
पावोत आत्मिस्थति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥
तुका म्हणे छंद । आम्हां हरिच्या दासां निंद्य ॥३॥
अर्थ :- परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी कोणी तपच्यर्या करतो, तर कोणी देह अग्नीला अर्पण करतो ।।1।।
आम्ही मात्र त्या वाटला जाणार नाही ; तर पंधारीच्या वाटेवर भक्तीने, श्रध्येने नाचत राहु ।।ध्रु।।
कोणाला आत्मस्तिति प्राप्त होवो अथवा कुणाला मुक्ती मिळो ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या नामस्मरनाशिवाय इतर छंद आम्हाला (हरिदासांना) वर्ज्य आहेत ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा