गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

४१०आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं

मृदंग पाट्या

गाथा अभंग ४१०

आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥

सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥

सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥

तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥

अर्थ :- जगात इतर गौळयांची मुले काय थोड़ी आहे का ? परंतु ती खोट्या, वाइट बुद्धिची आहेत ।।1।।

त्यांची इंद्रियरूपी गुरे नेहमीच मोकाट असतात; त्यामुळे सतत फजीती होते ।।ध्रु।।

त्यांच्यात नेहमीच तंटे-वाद होतात. कोणीही कोणाचे एकत नाही. ती काम करीत नाहीत ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची घरी असलेली मायारुपी आई त्यांना नेहमी नाराते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा