डाकेचे अभंग
गाथा अभंग ४१९
खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥
आतां करी कां रे हाकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥
सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥
लाविलें कावरें । प्रल्हादा म्हैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥३॥
वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥४॥
पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥५॥
नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥६॥
कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥७॥
अर्थ :- भीमा नदीच्या काठी, पंढधपुर नगरात एक मोठे दैवत आहे. त्याच्या धाकामुळे असुर, काळ, खेचर ई. थरथर कापतात ।।1।।
विष्णूच्या सहस्त्र नामाचा जप केला, की तो आपल्याला जवळ घेतो व प्रपंच्यरूपी भुताला पळवून लावतो ।।ध्रु।।
रावण नावाच्या भूतान सीतला झड़पले होते. परिणाम तिला अशोक वनात राहावे लागले; परंतु ही सीतामाई त्या भूतांचा नाश करण्यासाठी स्वतःचे केस मोकळे सोडून निर्भयपने तेथे गेली ।।2।।
हिरण्यकशपु नावाच्या आसुराने कोठे आहे तुझा देव, असे विचारुण बाळ प्रल्हादाला त्रासुन सोडले. त्याचा भयंकर धळ केला, परंतु नारसिंहरुपात आई खांब फोडून प्रकट झाली ।।3।।
कंस नावाच्या भूताने वासुदेवाची सात बाळ खाल्ली, त्याचा संहार करण्यासाठी कृष्णई अवतारालि ।।4।।
पांडवाना कौरवांनी देशोधड़ीला लाउन वनवन फिरायला लावले. तेव्हा कृष्णइने त्याना जवळ केले व सन्मानाने त्यांचे राज्य मिळवून दिले ।।5।।
तिचा नामघोष जिथे होतो, तेथे ती स्वतः प्रकट होते. भक्तांचा भक्तिभाव पाहते. भक्तांमध्ये लहान-थोर ऐसा भेदभाव करत नाही ।।6।।
तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपुर वासिनी माता आमचे कुलदैवत आहे; त्यामुळे आम्हाला काळिकालाचे, यमदुतांचे वा भूतांचे भय नाही ।।7।।
वाज केली फीरती वनी । वेडीच्या ऐवजी वनी हा शब्द आवश्यक आहे
उत्तर द्याहटवा