मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३६९माझिये मनींचा जाणोनियां भाव

॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली ॥ - अभंग ४

गाथा अभंग ३६९

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥१॥

आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥

जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥२॥

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥३॥

तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥

अर्थ :- माझ्या मानाचा भाव जाणून गुरु महाराजानि माला असा उपदेश केला ।।1।।

माझ्या आवादीचा साधा सोपा मन्त्र सांगितला. यात कोठेही गुंता नाही, हा अतिशय सोपा ऐसा मंत्र आहे ।।ध्रु।।

अनेक साधुसंत या नाममंत्राच्या अधारे भवसिंधु तरुण पुढे गेले ।।2।।

जानत्या व नेनत्या अशा दोघांच्या आवडीनुसार त्याना भवसागर तरुण जाण्यासाठी सांगड़ी, ताफे, पेटे अशी साधने दिली ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, कृपासागर ऐसा पांडुरंग सर्वाना तारुन नेण्यास समर्थ आहे. गुरु महाराजांनी हा तारु माला दाखविला ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा