गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

३८०आजि नवल मी आलें येणे राणें

गौळणी

गाथा अभंग ३८०

आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ।

गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥

गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं ।

अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ध्रु.॥

बहुत कामें मज नाहीं आराणूक । एक सारितां तों पुढें उभें एक ।

आजि मी टाकोनि आलें सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥२॥

चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां दोघेजणें ।

सुखें निर्भर जालियें त्याच्या गुणें । तुका म्हणे खुंटलें येणें जाणें वो ॥३॥

अर्थ :- सहजच आज मी परमार्थरूपी अरण्यात आले तर काय अतभुत-आश्चर्य ! कृष्णचि अवचित भेट झाली. काही अनुभवी गोपी मला अगोदर सांगत होत्या की या वनातून गेलीस तर कृष्ण तुझ्या अंगाशी लगट् पना करेल. मला याची कल्पना होती; परंतु माझे नाशिबच तसे होते, त्याला मी तरी काय करणार? त्या नाशिबानेच मला या वनात खेचून आणले ।।1।।

जे व्हायचे होते ते होऊन गेले. अता काही विलाज नाही. एकदा कृष्णरूप झाले की त्या स्तितित येता येत नाही. कृष्ण जेव्हा मला आत्मतत्वाने भेटला त्या वेळेही त्याच्या तवाडीतून सुटन्यासाठी मी सर्वाना हका मारल्या; परंतु कृष्ण शिवाय तेव्हा तेथे कुनिच नव्हते. तो माझ्या जीवरूपी अंगाला जडला. मग त्या ठिकाणी माझे काय उरले? ही गोष्ट गुप्त राहिलेलीच बरी नाहीतर लोक बदनामी करतील ।।ध्रु।।

प्रपंच्यात कामां मुले मला आजपर्यंत वेळ मिळाला नहीं. एका नंतर दूसरे काम माझ्या पुढे होते. टी सारे काम सोडून वनात आले; तर येथे श्रीकृष्णने काही वेगळेच कारस्तान रचले होते. ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात. लोक आपली निंदा करतील, अशी चिंता ती गौलन करत असतांना नारायनाने तिला अश्या अवस्तेवर आणले, की जेथे लोक मर्यादा राहील, तिची चिंता त्याने दूर केलि. गौळण-श्रीकृष्ण ब्रह्मरूप झाले. ती गौळण सुखी झाली. जन्म मृत्युच्या फेऱ्यांतून ती मुक्त झाली ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा