गाथा अभंग ३३६
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया सेवटीं । जालें लटिकें सकळ ॥१॥
वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ध्रु.॥
सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥
तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥
अर्थ :- अज्ञानाच्या निद्रित माला जन्म-मृत्युने वेढिला धरले होते, ब्रह्मज्ञानाची जागृति आल्यावर या गोष्टी खोट्या ठरल्या ।।1।।
प्रपंकबिक असतांना आत्मज्ञान स्वरुप पाहण्याची व्यर्थ उठाठेव केली, पण नंतर कळुन चुकले, की ही अवस्था प्राप्त होण्यासाठी गरीब-श्रीमंत असा भेदाभाव केला जात नाही ।।ध्रु।।
प्रपंच्यात सुख दुःख, वेदना सहन केल्या; पण त्या स्वप्नवत वातल्या. प्रपंच्यातील दुःखमुळेच परमार्थाकडे वळलो आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ति झाली ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्यातुं बाहर पडन्यासाठी मला संतानी मोलाची मदत केलि, त्यामुळे मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले, नाहीतर हरिभक्तिविना तसाच प्रपंच्यात अडकून पडलो असतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा