मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३४५ऐसे ऐसियानें भेटती ते साधु

गाथा अभंग ३४५

ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु ।

जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥

भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्ति भेदु।

भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥

मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।

लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥

अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।

वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥

मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।

साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥

अर्थ :- जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात, त्याच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुनच्या दर्शनान सर्व पाप नाहीस होतात ।।1।।

त्यांच्या ठिकाणी स्तिरबुद्धि , नास्तिक्यभेद करणारी बुद्धि आहे, भूतदया आहे, ज्यांच्या मनात शत्रु, मित्र, पुत्र या सर्वान प्रती समभाव आहे ।।ध्रु।।

शारीर, वाणी, मन आणि बृद्धि शुद्ध असावी. सर्वत्र विठ्ठालाचे स्वरुप पहावे , विनम्रता असावी, अहंकार नसावा ।।2।।

ज्याच्या मनी कामवासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही , जो समाधानी वृत्तिचा आहे, त्याला संतसज्जन आनंदाने भेटतात ।।3।।

तुकोबा म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ़ वीश्वास धरा, जो प्रपंच्याला विटला आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा