गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

३७७स्वयें सुखाचे जाले अनुभव

गौळण

गाथा अभंग ३७७

स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ।

अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥

आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।

एका मेघःशामें जलधर वोल । रसीं उतावळि हृदय सखोल वो ॥ध्रु.॥

एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं ।

अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥

स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर ।

परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥३॥

भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।

दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरि वो ॥४॥

तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून ।

पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥५॥

अर्थ :- गौळणींना आत्मसुखाचा अनुभव प्राप्त झाले. त्या अनुभवांचे त्या एकमेकिंन समोर वर्णन करीत होत्या. श्रीकृष्ण हा सर्व प्रकार सर्वांच्याच् आश्चर्याचा विषय झाला होता. सर्वज्ञानी, सर्वसाक्षी अशा या बाळकृष्णच्या ठिकाणी त्यांचा जीव जदलेला होता ।।1।।

त्या एकमेकिंमध्ये आश्चर्य व्यक्त करत होत्या. त्या सुखाचे वादावाद करने संपत नव्हते. त्यांच्या अंतकरणात सावल्या परब्रम्हाची ओढ़ होती. त्यांचे अन्तःकरण सखोल होते. रस भरून घेण्यासाठी त्या आतुरल्या होत्या ।।ध्रु।।

हरी-कृष्ण हाच सर्वांच्या आवडीचा विषय होता. त्याच्या आवडिने इतर वस्तुंच्या ठिकाणी आवड निर्माण होत होती. लोकांमध्ये त्या प्रेमाने अंध-बंधित झालेल्या होत्या; परंतु सर्व पुराणानि त्यांची कीर्ति गाईलि आहे ।।2।।

आपल्या आवडत्या व्यक्तिचि स्तुती इतरांच्या मुखातून ऐकताना फार गोड वाटते. प्रेमाला पात्र अश्या व्यक्तींच्या सर्वानी गौरव करावा, अशी अपेक्षा असते. दोन प्रिय व्यक्तींमध्ये परस्परांण विषयी परस्पराना आदर असतो. या संकेतानुसार त्या गौळणींना प्रितिस पात्र अश्या श्रीकृष्णचा योग लाभल्यामुळे त्या गौलाणीच्या सुखाला पारावार राहिला नव्हता ।।3।।

साऱ्या विषवत कोठेही जरी त्या गौळणी असल्या तरी त्यांच्यातील श्रीकृष्णप्रेम कधीच कमी पडत नव्हते. हां अपला, हां पराका ऐसा भेदभाव त्यांच्या पाशी उरलेला नव्हता. श्रीकृष्ण त्यांच्या संचित कर्मानुसार त्याना कधी जवळ, तर कधी दूर ठेवत होता. छरीला भक्तांच्या रंगानुसार आपला रंग ठेवावा लागतो ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, अहो, मला उच्छिष्ट प्राप्त झाले. त्याचा परिणाम होऊन प्रेम ओसांडून बाहर आले. जे कानी पडले ते जिवापाड जपले आणि आपार श्रद्धाभावाने भागवंतचे चरण हृदयाला धरले ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा