डाकेचे अभंग
गाथा अभंग ४१४
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥१॥
माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥
तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥
आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥
आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥४॥
उगविलीं कोडीं । मागें कितेकांचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥
अर्थ:- माझा देवहारा खरा असल्याचे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो.माझ्या देवहारातील देवांवर शुध्द, सात्विक भाव ठेवा. त्रिगुणांनचा फुलोरा आना असे मी विनावित आहे ।।1।।
माझा देव सज्जनांमध्ये माचतो. हे दैवत अंगात संचारले की ते दोहोंचा निवडा करते ।।ध्रु।।
तुझे तुझ्याजवाळच आहे, पण तू जागा चुकला आहेस. तुझ्यातील विकारांनी तुझा सर्वनाश केला आहे ।।2।।
आता माझ्या देवाशिवाय खरे सुख कोठे आहे, हे तुला कळणार नाही त्यासाठी प्रथम अंधार दूर सारावा व योग्य ठिकाण शोधावे ।।3।।
आमची विठाइ आंधळयास डोळे , पांगळ्यास पाय, वांझेला पुत्र देते. सार्यांचे नवास पूर्ण करते ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, आता पर्यंत तिने अनेक गरीबांचे संकटे निवारलि आहेत. त्यासाठी तुम्ही नवस करा; मग तो पूर्ण होण्यास विलंब होणार नाही ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा