मंबाजी गोसावी यानी स्वामींन वर पीड़ा केली
गाथा अभंग ३५७
पावलों पावलों । देवा पावलों रे ॥१॥
बरवें संचित होतें तैसें जालें रें । आतां काय बोलों रे ॥२॥
सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥
अर्थ :- देवा, मला सारे काही भरून पवले आहे रे ।।1।।
जसे माझ्या नशिबात होते, त्या प्रमाणे मला त्याचा योग्य तो अनुभव आला आहे. आता अधिक काय बोलू रे? ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, वाटेतले काटे दूर करून चांगली वाट करण्यासाठी चांगल्या वृत्तिने प्रयन्त केला, तर मंबाजीने दूर नेउन मला मारले रे! ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा