मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३६८सद्गुारायें कृपा मज केली

॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली ॥ - अभंग ४

गाथा अभंग ३६८

सद्गुारायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥

भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥

कांहीं कळहे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ॥३॥

राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण मळिकेची ॥४॥

बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥५॥

माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥

अर्थ :- सद् गुरुरायानी माझ्यावर कृपा केली ; परंतु माझ्याकडून काही त्यांची सेवा घडली नाही ।।1।।

गंगास्नानाला मी जात आहे, असे मला स्वप्न पडले, त्या स्वप्नात गंगेच्या वाटत सदगुरु माझा शोध घेत आहे. त्यांनी माझ्या मस्तकावर आपला कृपाकर ठेवला ।।ध्रु।।

(कदाचित माझी परीक्षा पाहान्यासाठी) मझायाकडे भोजनासाठी त्यांनी पावशेर तूप मागीतले. स्वप्नात मला त्यांचा विचार पटला ।।2।।

असा अंतराय मध्येच कसा काय निर्माण झाला, काही कळत नाही. त्यांनी निघण्याची घाई केली ।।3।।

राघवचैतन्य, केशवचैतन्य अशी गुरुपरंपरेचि खून सांगीतलि ।।4।।

स्वताचे नाव 'बाबाजी' असे सांगितले. 'रामकृष्ण हरी' हा मंत्र दिला ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, सदगुरुनी माझा स्वीकार खेला, तो दिवस माघ शुद्ध दशामिचा व वार गुरुवार होता ।।6।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा