गाथा अभंग ३६३
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥१॥
तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥
अर्थ :- पूर्वी वैकुंठलोकास जाण्यासाठी तपश्चर्यसारखे कष्ट करावे लगत असत; त्यामध्ये जीवही गमवावा लगत असे ।।1।।
पण भक्त पुडलिकाने भक्तांवरि मोठा उपकार केला आहे; त्याने दाखविलेल्या भक्तिमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला ।।2।।
तुकोबा महानता, की वैकुंठाची अवघड पायवाट सोपि झाली आहे, ही पायवाट म्हणजे पंढरी. पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा