गौळणी
गाठ अभंग ३८८
मिळोनि गौळणी देती यशोदे गार्हागणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकां नुरे कांहीं ।
मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥
हरि सोंकला वो हरि सोंकला वो । सोंकला तो वारीं तुज लाज नाहीं तरी ।
आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ध्रु.॥
तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो ।
आम्ही जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आम्हां ॥२॥
मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती म्हणे आणा शीक लावूं ।
थोर आणिला कांटाळा घरीं दारीं लोकपाळां । डेरा रिघोनी गुसळा तेथें लोणी खाय ॥३॥
मिळोनि सकळा दावें लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा ।
बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिसिल चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे ॥४॥
फांकल्या सकळा उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही ।
उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥५॥
अर्थ :- सर्व गौळणी गोला झाल्या व् यशोदेला श्रीकृष्णच्या खोडयांचे गर्हाने सांगू लागल्या. त्या म्हणाल्या यशोदे, तुझा हां पोर आमच्या कडिल शिंकाळ्यावर् दही, दूध, लोनी, तूप काहीच राहु देत नाही. गावातील पोरे जमा करतो आणि आमच्या घरात शिरुण त्याला पकडन्यास वेळहि मिळू न देता त्वरेने सारे दही, दूध, लोनी, तूप स्वतः खातो व आपल्या मित्रांना देतो ।।1।।
अश्या प्रकार हा तुझा हरी सोकावला आहे. तू त्याला चांगली शिक्षा कर. तू शिक्षा केलि नाहीस. तर तुलाही लाज नाही अशे आम्ही समजु. तो जर आमच्या तावदित सापडला नाही तर तुझाहि मोठेपणा राहणार नाही ।।ध्रु।।
त्याच्या खोड्यांचे तुला कौतुक वाटते. त्यालाही तो मोठे गोड वाटते. यशोदे, अग अशी हसतेस काय ? तुला वेड लागले की काय? आम्ही तुझ्या मोठेपनाकडे पाहुन या खोडया सहन करतो; पण या तुझ्या पुराने आमच्या पोरापोरिणा वाइट वळण लावले आहे. हे भांडखोर स्त्रिये, तुला याहन अधिक काय सांगावे? आम्हालाच लाज वाटते ।।2।।
श्रीकृष्ण त्यावेळी मान खाली घालून म्लान चेहर्याने गळ्याखालील हाडावर् हनुवटी टेकुन उभा होता. तेव्हा यशोधा म्हणाली, "आना त्याला इकडे. त्याला चांगली शिक्षा करू." याने गावातील सर्व सान-थोरांना त्रास देवून आम्हाला नाको-नाको करुण सोडले आहे. मी दही घुसळत असले की हा देर्यातले लोनी खातो ।।3।।
सर्व गौळनिंनि मिळून कृष्णच्या कळ्यात दावे घातले व त्याला उखळाला बांधले. तेव्हाहि श्रीहरि निश्चल बसून राहिला. हे पाहिलूं हौळनी हसून म्हणाल्या, बरा आयता सापडलास. या पुढे चोरी करशील का? ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, त्या साऱ्या जानी इकडे तिकडे गेल्यावर श्रीकृष्ण उखळासह रांगत गेला. नळ व कुबेर याना शाप मिळाल्यामुळे यांचे विमल व् अर्जुन असे वृक्ष झाले होते, ते दारात उभे होते. त्यांच्या फटीतून श्रीकृष्णने उखळ ओढ़त नेले. त्याना उपटुन मोडून काढले आणि नल कुबेर याना शाप मुक्त केले. खुप मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकून एशोधयेचा धीर सुटला; परंतु श्रीकृष्णला सुखरूप पाहुन तिने त्याला प्रेमाने आलिंगन दिल ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा