गाथा अभंग ३४६
भवसाव्गर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥
त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥
सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥
भुक्तिमुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
अर्थ :- हे जनाहो, हां भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता ? तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान विठ्ठल पैलतीरावर हात कटावर ठेऊन तत्परतेने उभा आहे ।1।।
त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही, फक्त भक्तिभावाने त्याच्या पाई मीठी घाला, तो तुम्हाला विनामोबादला आपल्या खांद्यावर घेईल ।।ध्रु।।
त्याला फक्त तुम्ही भक्तिभावाने चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सिखाने करा, दोन वार (वारि) चुकवु नका. मग दया क्षमा चालात तुमच्या घरी येतील ।।2।।
तुकोबा म्हणतात, या पांडुरंगाची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्य येणार नाही, मुक्तिची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा