गौळणी
गाथा अभंग ३९२
विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती ।
न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती ॥१॥
खुंटलीसी जाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवती ।
त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥
बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना जाला तेणें संचार ।
विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥२॥
तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा ।
त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा ॥३॥
अर्थ :- कृष्णवीरहाच्या तापमध्ये एक गौळण नादात बरळत होती, "हां पहा हरी, तो पहा हरी' आणि भानावर येताच हरी नसल्याच्या जानिवेने निराश झाली. आपला तोल तिला सावरला नाही, त्यामुळे तिने भुईवर अंग टाकले आणि सभोतालि पाहू लागली. अशी लोकविलक्षण कृती केल्यामुळे कुळा-जातीतून ती भ्रष्ट होत होती ।।1।।
तिल सामान्य सितित आणण्यासाठी अनेकांनी तर्हतर्हेचे प्रयत्न केले; परंतु ते सर्व असफल झाले व स्वकीय, परका असे भाव तिच्या मनातून नाहीसे झाले. श्रीहरिचे नाव घेत ती ओरडू लागली. ते पाहुन तिच्या आजु-बाजूच्या गौळणी हसु लागल्या ।।ध्रु।।
घरात जराहि न थांबता ती रानाकडे धावू लागली. चित्तात् श्रीकृष्णचा संचार झाल्यामुळे ती बंधनात सापड़ेना. सासर-माहेर दोन्हीही ती विसरली ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व गौळणी स्वस्थ् रहा. हरीचा ध्यास घेतलेल्या त्या गौळनीला जबरदस्तिने ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करू नका. ज्याच्या त्याच्या मुखाने वेगवेगळा निर्णय झाला आहे. बहुमताने तर्कवादाने वेगळा निर्णय झाला आहे. ('देव आहे' यबद्दलचा निर्णय देवाच्याच मुखातून गितेने सांगितलेला आहे) ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा