मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३६१ध्यानी योगीराज बैसले कपाटीं

गाथा अभंग ३६१

ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥

तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥

कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥

कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥

तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥४॥

अर्थ :- योगी, तपस्वी, साधू ईशचिंतन करीत डोगरकपरित ध्यानस्त बसलेले आहेत, त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत आहे ।।1।।

त्यांची तकहान-भूक भागाउंन, त्यांचे चित्त देहभावाविषयी उदासीन करीत आहे ।।ध्रु।।

त्याना हरी शिवाय कोणतेही सगे-सोयरे नाहीत ।।2।।

तेथे त्यांच्या जीवाला आनंद वाटत आहे, राज्याभिलाश्या त्यांच्या मनात शिवतहि नाही ।।3।।

तुकोबा म्हणतात, त्या नारायनाची कृपा झाली म्हणजे सर्व दुःख अमृतासमान भासते ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा