गाथा अभंग ३६१
ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥
तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥
कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥
तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥४॥
अर्थ :- योगी, तपस्वी, साधू ईशचिंतन करीत डोगरकपरित ध्यानस्त बसलेले आहेत, त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत आहे ।।1।।
त्यांची तकहान-भूक भागाउंन, त्यांचे चित्त देहभावाविषयी उदासीन करीत आहे ।।ध्रु।।
त्याना हरी शिवाय कोणतेही सगे-सोयरे नाहीत ।।2।।
तेथे त्यांच्या जीवाला आनंद वाटत आहे, राज्याभिलाश्या त्यांच्या मनात शिवतहि नाही ।।3।।
तुकोबा म्हणतात, त्या नारायनाची कृपा झाली म्हणजे सर्व दुःख अमृतासमान भासते ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा