गाथा अभंग ३४३
काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥
ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥
अर्थ :- आम्ही विट्ठलाचे पाईक आहोत; त्यामुळे आम्हाला कोणतीही उणीव भासत नाही ।।1।।
हे सुख सोडून दारोदारी सुख शोधण्यासाठी आम्ही भटकत नाही ।।ध्रु।।
माझ्या विठ्ठला पेक्षा बलवान दुसरा कोणीही नाही ।।2।।
तुकोबा म्हणतात, माझ्या विठ्ठालाच्या गावी मोक्षाची कोठारे आहेत, त्याची लयलुट करा ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा