गाथा अभंग ३६०
पुत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥१॥
तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ध्रु.॥
नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥२॥
तुका म्हणे पाहे । कासवीचें पिलें माये ॥३॥
अर्थ :- परगावि असलेल्या आपल्या पुत्राच्या खुशालीचि वार्ता एकन्यास ज्याप्रमाणे आई उत्सुक असते ।।1।।
त्याप्रमाणे हरिचे गुणगान वर्णन करण्यासाठी आणि गन एकन्यासाठी माझे मन अधीर झाले आहे ।।ध्रु।।
मधुर आवाजामुळे हरिण लुब्ध होते आणि आपले आस्तित्व विसरत ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, कसविचे पिल्लू जसे कासविकडे नजर लाऊंन बसलेले असते, ताशी माझी स्तिति व्हावी ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा