गाथा अभंग ३४१
नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥१॥
पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥
लटिक्याचे पुरीं । वाहोनियां गेलों दुरी ॥२॥
तुका म्हणे नाव । आम्हां सांपडला भाव ॥३॥
अर्थ :- मी परमार्थाविषयी सावचित्त नव्हतो म्हणून माझे अहित झाले ।।1।।
संसार वाढविता वाढविता मला मनाचा विसर पडला ।।ध्रु।।
प्रपंच्यातील खोट्या लोभाला भुललो त्यामुळे पर्मार्थापासून दूर गेलो ।।2।।
तुकोबा म्हणतात, विठ्ठलरूपी नाव सापडल्यामुळे या भवसागरातून आम्ही तरुण जाउ ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा