मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३७०घालुनियां भार राहिलों निश्चितीं

॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली ॥ - अभंग ४

गाथा अभंग ३७०

घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥

लावूनियां हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥

कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥२॥

खुंटले सायास अणिकि या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥

तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥

भावार्थ  :-  कृपाळू संतांवर आपला सर्व भार घालून मी निश्चित राहिलो. त्यानी मला विठोबाच्या स्वादिन केले ।।1।।

माझ्या मस्तकावर हात ठेवला. माझा माथा कुरवाळला आणि 'चिंता करू नकोस' असे सांगितले ।।ध्रु।।

दोन्ही हात कमरेवर ठेऊन साजिर्या अश्या समचरणरुपात तो चंद्रभागेच्या तिरावरति उभा आहे ।।2।।

हे केशवा, माझे सारे प्रयत्न कुंठित झाले असल्यामुळे तुझे पाय धरले आहेत ।।3।।

अनंता, आता तुला जसे वाटेल तसे कर. संतानाच माझी लाज आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा