डाकेचे अभंग
गाथा अभंग ४२२
अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥
मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥
आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥३॥
माझ्या अंगात देव खेळते हे तुम्हाला कसे समझले नाही? माला सुख-दुःख यांची जाणीव नाही, म्हणजे हे चाळे दूसरे कुणाचे असनार ? ।।1।।
माला अता भान उरलेले नाही. माझा भाव पालटला आहे. तो झाकल जाणार नाही ।।ध्रु।।
आपल्या मनातील गोष्टीनचा विचार आपण करावा. वृत्ति स्तिरावल्यावर विचार कसा कळणार ? ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, ज्या वेळी हा लाभ होतो, त्या वेळी थंड राहु नये. तशी संधी परत कशी मिळणार ? ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा