मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३४९अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं

गाथा अभंग ३४९

अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१॥

जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥

याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥

तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥

अर्थ :- अमंगळ वाणी कानानि कधीही एकु नये ।।1।।

जो हरिकथेच द्वेष करतो, त्याला क्षयरोगाची व्याधि होते ।।ध्रु।।

असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी चांडाळ समजावा ।।2।।

तुकोबा म्हणतात, तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे, त्याला स्वतःचे मायबाप आवडत नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा