गाथा अभंग ३६६
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥
नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥
पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥
तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥
ज्याची पूर्ण श्रसद्धा व प्रेम विठ्ठलावर (देवावर) आहे, इतर कोणत्याही वस्तुवर नाही, तोच खरा विष्णुभक्त होय ।।1।।
ज्याला तन, धन, जन हे विठ्ठलासमोर तृणासमान वाटतात, ज्याला केवळ एक भगवंत (विठ्ठल) देवच मान्य आहे ।।धृ।।
कोणत्याही कठिन प्रसंगी जो आपली उपासना खंडित करत नाही, ।।2।।
तुकोबा म्हणतात, त्याची जात कोणतीही असो, तो वैष्णवच आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा