गौळणी
गाथा अभंग ३७८
आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणी एका मन लगे तुझ्या चित्तीं ।
दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि चित्तीं वो ॥१॥
सर सर परती जालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं जाला खंड वो ॥धृ ॥
होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी ।
नाहीं मर्यादा निःसंग बावरी । मन हें गोविंदीं देह काम करी वो ॥२॥
नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें ।
नाहीं अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुज देहभावें वो ॥३॥
कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवतीं बहुत ।
दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥४॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना ।
परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणें ऐसें कळों यावें जना वो ॥५॥
अर्थ :- सासु सुनाला म्हणते, 'का ग? तुझे मन स्तिर दिसत नाही? काही काम सांगितले तर तुझे कामात लक्ष नाही. वास्तु ठेवायला दिली तर ती विसरतेस. तुझ्या चित्तात हरी येऊन बसला आहे की काय? ।।1।।
जा, माझ्या पासून दूर हो, तू निर्लज्ज आणि लबाड़ झाली आहेस. हे काळे तोड़ जगाला काय दाखवितेस? ज्या मातेने तुला जन्म दिला, तिला लाजेने मान खाली घालायला लावलीस . सासर- माहेर दोन्हीपैकी कशाचाच आधार तुला राहिलेला नाही. दोन्ही तुला अंतरले आहेत ।।ध्रु।।
आत भरलेले होते ते बाहेर आले. ती इतके दिवस अंतरातले चोरून ठेऊन संपादनी करत होती. आता तिला मर्यादा राहिली नव्हती. नि:संगपने वावरत होती. मन हरिच्या ठिकाणी गुंतले होते. फक्त देह संसारातील कामे करत होता ।।2।।
तू कोनालाच उत्तर देत नाहीस. दुसर्याने काही आणून दिल तरच खातेस. खंदयावरचा पदर सावरण्याचेही तुला भान राहिले नाही. तिचे देहभान उदासीन झाले ।।3।।
ऐसा हां एकांत भाव तिला कुठे प्राप्त झाला, कळतच नाही. सभोताली सदा कलकल असूनही त्याच्याशी एकांतात गोष्टी बोलान्यास तिला लाज वाटत नाही. कृष्णच्या हातात हात दिला ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकारे सासु-सुनांमध्ये भांडने लाउन कान्होबा आपले लाघव दर्शवित होता. ही पराभक्ती आहे, हे लक्षात घ्या. हे सर्वाना समजावे ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा