मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३४७जें का रंजलें गांजलें

गाथा अभंग ३४७

जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥

मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥

ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥

दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥

तुका म्हणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥

अर्थ :- जे दुःखी कष्टी, प्रपंचीक त्रासाने गांजले आहेत, त्याना तोआपले म्हणतो ।।1।।

तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव संजावा ।।ध्रु।।

अश्या साधुंगे चित्त अंतरबाह्य लोन्याहून मऊ असते ।।2।।

ज्याला आधार नाही, जो निराधार आहे, त्याला आपल्या वृदयाशी धरतो ।।3।।

जे प्रेम आपल्या पुत्रावरती करतो , तेच प्रेम तो आपल्या दास दासींवर करतो ।।4।।

तुकोबा म्हणतात, असे संतसज्जन म्हणजे साक्षात भगवंताची मुर्ति असते; यापेक्षा अधिक काय सांगू ? ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा