गौळणी
गाथा अभंग ३८६
काय उणें कां करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी ।
परपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात ।
न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त ॥ध्रु.॥
बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी ।
करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥२॥
तुज म्हणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता ।
न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥
अर्थ :- कृष्ण चोरी करू लागला. गौळणी यशोधेला तक्रार् सांगत येऊ लागल्या; तेव्हा यशोधा कृष्णल म्हणते, तुला घरात काही कमी आहे का? तू लोकांच्या घारी का चोर्या करतोस? कितीही सानगितले तरी तू का एकत नाहीस? धरायल जावे तर तू दूर-परावाणीच्याही पलीकडे पळून जातोस. असा न आवरनारा, अलौकिक, विलक्षण आहेस तू. तुझे वागणे मला काळतच नाही। ।।1।।
यशोधा काकुळतीला येवून कृष्णला म्हणते. अरे, मी लोकांचे आघात तरी किती सोसायचे रे? सरळ पणाने वाग आणि माझी या लोकांन मधून सोडवणूक कर ।।ध्रु।।
संसाराच्या कामाच्या व्यापात मी गुंतलेली असते आणि हे हरी, तू माझी नजर चुकावून बाहर पळून जातोस. घाइने तुझा पाठलाग गेला तरी तू सापडत नाहीस. सगळे कष्ट वाया जातात ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता, तू सर्वगुणसंपन्न आहेस. मी तुला कोणतेही कष्ट पडू देणार नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा