गौळण
गाथा अभंग ३७६
होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ।
व्हावी भेटी ते जाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥
स्थिर स्थिर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ध्रु.॥
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी ।
नाहीं लौकिक स्मरला आवडी । आता येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥२॥
उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥
अर्थ :- गोविंदाचि भेट व्हावी, ऎसे माझ्या मनात होते. मी त्यासाठी नावसाहि केला आणि ते आज फळाला आले. आता निश्चयाने मी गोविंदाची सेवा करील ।।1।।
संतमंडळींनो, मला या सेवेसाठी मदत करा. जन्म-मृत्यु, दुःख हे पूर्वी मी पुष्कळ सोसले. अहंकाराचा वारा जर येथे अडथळा करू लागला तर मला ते सहन होणार नाही. त्या विरोधाला मी आडवे कपाट लाउन मी येथे आणले आहे. यापुढे काही अदाथाळे आले तर त्याचे तुम्ही निवारण करा ।।ध्रु।।
प्रयत्नाने माला ही आत्मस्वरूपाची प्राप्ति झाली आहे . हिच्यावर मूळ हक्क हा आमचा आहे. या लाभापासून मी जरादेखिल वेगळी होणार नाही कोणताही लौकिक मनात न आणता ही स्तिति प्राप्त करून घेतली आहे. आता त्याच्या लोभान, आवाडीने मी वेडी झाली आहे
।।2।। तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मस्तितिप्राप्तिविषयीच्या ज्ञानाचा अवकाशात सावकाशपने उदय झाला आहे. संसारा विषयी मी आता निष्काळजी झाली आहे परमार्थाची आवड धरल्यामुळे त्याचा अपमान आनंद उपभोगीत आहे. पुन्हा ऐसा सोन्याच्या दिवस कधीच येणार नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा