गौळणी
गाथा अभंग ३९५
धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें ।
एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या राणें रे ॥१॥
सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरीं ।
सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ध्रु.॥
सखिया वेशिया होतिया । तुज फावलें रे फांकतां तयांसी ।
होतें अंतर तर सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥२॥
कैसी भागली हे करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां कर ।
स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥
अर्थ :- एक गौळण म्हणाली, देवाने माझा पदर धरला. काही केल्या तो सोडेना. हे जर मला अगोदर माहीत असते तर मी येथे एकटी आलीच नसते. ये घनदात अरण्यात मी कोठे येऊन पडले ! ।।1।।
हे हरी, पदर सोड. मला जावु दे. घरी जायला उशीर झाल तर घरचे लोक रागावतील. माजी सासु आणि सासरे फार कड़क आहेत. त्याना काळाले तर तुझी नि माझी काहि धडगत नाही ।।ध्रु।।
मैत्रिणी माझ्या जवळ होत्या. त्या दूर गेल्यामुळे माझा पदर धरन्याची तुला संधि मिळाली. तुझ्यापासून जर दूर असते तर मी अशी तुझ्या हाती लागलेच नसते. पण मी जवळ आहे. त्यामुळे तू एकदम येवून आंगाला झोंबलास ।।2।।
देवाजवाळ असे बोलल्यामुळे ती गौळण थकुन गेली . पदर सोडवन्याच्या प्रयत्नामध्ये तिची शक्ति क्षीन झाली. तुकाराम महाराज म्हणतात, भोग घेण्यात माझा स्वामी चतुर आहे. जो भोग घेतो, त्याची लोकमर्यादा देव राखतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा