गाथा अभंग ३३०
मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥
नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥
चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥
झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥३॥
अर्थ :- या पूर्वी या भक्तिमार्गाने अनेक साधुसंत गेले आहेत ।।1।।
प्रपंचातील आदवाटीने तुम्ही जावु नका , असे पुराने गर्जना करून सांगतात ।।ध्रु।।
पुढे गेलेल्या संतानी या वाटा स्वछ्य केल्या आहेत, त्यामुळे कोणालाही न विचारता या धोपटमार्गावरून जाता येते ।।2।।
तुकोबा म्हणतात, या मार्गावरून जाणाऱ्या विष्णुदासांनी खांद्यावर गरुड़ चिन्हांकित पताका घेतल्यामुळे या वाता झळकत आहेत ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा