मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३३०मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत

गाथा अभंग ३३०

मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥

नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥

चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥

झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥३॥

अर्थ :- या पूर्वी या भक्तिमार्गाने अनेक साधुसंत गेले आहेत ।।1।।

प्रपंचातील आदवाटीने तुम्ही जावु नका , असे पुराने गर्जना करून सांगतात ।।ध्रु।।

पुढे गेलेल्या संतानी या वाटा स्वछ्य केल्या आहेत, त्यामुळे कोणालाही न विचारता या धोपटमार्गावरून जाता येते ।।2।।

तुकोबा म्हणतात, या मार्गावरून जाणाऱ्या विष्णुदासांनी खांद्यावर गरुड़ चिन्हांकित पताका घेतल्यामुळे या वाता झळकत आहेत ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा