गौळणी अभंग
गाथा अभंग ३३८
बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी ।
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥१॥
बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें ।
जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥
मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं ।
विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥२॥
एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे ।
लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥३॥
वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ।
कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥४॥
वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं ।
तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं । स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥५॥
अर्थ :- बाळपनि श्रीकृष्ण मथुरेतील गोकुळात खेळत होता. त्याच्या पायात घागर्या, गळ्यात सरी, कमरेला कडदोरा, दंडात वाळी असे दगदागिने न्यालेले हरिचे सुंदर रूप यशोधेने पाहिले. त्या वेळी तिच्या मनात सुख मावेनासे झाले. आणि आज माझे भाग्य धन्य झाले. ऎसे ती आनंदाने म्हणू लागली ।।1।।
हे बाल चांगले. असे चांगले म्हणनेहि कमी ठरेल इतके ते चांगले आहे. मला ते प्राणापेक्षा अधिक प्रिय आहे ।।ध्रु।।
त्या बाळकृष्णला पाहण्यासाठी सर्व जातिजमातिंछा स्त्रीया , मूली यशोधयेच्या घरी येत. त्याना देहभानाची जान उरली नव्हती. आपली लहानगी मुले त्यांनी घरीच ठेवली. नावर्याची भिती न बालगता, तहान-भूक विसरून त्या श्रीकृष्णला बघायला आल्या ।।2।।
काही गोपी आपल्या घरी होत्या ; परंतु त्याचे चित्त कृष्णकडे लागलेले होते. त्यामुळे त्या घराची काम आटोपुन कृष्णला बघन्यासाठी जाऊ इच्छित होत्या. लोकिकाची लाज, स्वताच्या देहाचि पर्वा त्यानी सोडून दिली होती. लोकलज्जेचि त्याना मुळीच फिकर नव्हती. सुखशय्येवर पहुडल्या असता ती सोडून त्या कृष्णला पाहन्यास त्या धाव घेत होत्या ।।3।।
त्या प्रमाणे लहान मूली , स्त्रिया, पुरुष सर्यांना कृष्ण दर्शनाचे वेध लागले. वयोवृद्ध स्त्रीयाहि देहभान विसरून लहान मुलींशी खेळू लागल्या होत्या. आपण कोण आहोत, याचे भान त्यांना राहिले नव्हते. कृष्णल पाहिल्यावर दृष्टी दुसरीकडे फिरेनाशि झाली ।।4।।
त्यांच्यापाशी विषमता, आप्त, स्वकीय, परकीय असे काही राहिले नाही. भेदभाव वैरभाव नाहीस झाल्यामुळे शोक, मोह. दुःख हे त्यांच्यापासून दूर निघुन गेले. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाने माझा स्वामी श्रीकृष्ण याने कौतुकाने लीला दाखवून सर्वाना सीखी केले ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा