गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

४०७हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती

गौळणी

गाथा अभंग ४०७

हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥

अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥

वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥२॥

तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥

अर्थ :- हरिचे एकांतात सुखभोग घेणाऱ्या चपळ अशा स्त्रीया देहभानावर एईना ।।1।।

सर्व विषयांचा भोक्ता पुरुषोत्तम त्यांचा सर्वांगानी भोग घेतो ।।ध्रु।।

श्रीहरिच्या सुखाचे वर्णन त्या वाचेने करू शकत नव्हत्या. कोठे काय करावे, अशी कर्तव्यशून्य अवस्था त्यांना प्राप्त झाली ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे वेड लागलेल्या, देहाबद्दल उदार झालेल्या त्या गौळणी सच्चितानंदस्वरुप झाल्या ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा