|| पंढरीचे माहात्म्य ||
गाथा अभंग ३३१
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जफवळां । सन्निध पंढरीये ॥१॥
पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥
चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥
मळिालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥३॥
नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥४॥
आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५।।
अर्थ :- साधकाहो, आपल्या डोळ्यांनी आपण कार्तिकिचा सोहळा पाहू. चला. पंधारीच्या जवळ साक्षात वैकुंठच् आहे ।।1।।
अपार पिक पिकले आहे. प्रेम गगनात मावेनासे झाले आहे. साड़ी पंढरी त्यात मस्त झाली आहे. घरोघरी सुकाळ् झाला आहे ।।ध्रु।।
भक्तगण स्तिरपने चालले आहेत. गरुद्धवजांचे भार त्यांच्याजवाळ आहेत. टाळ,मृदुंगाच्या नादात गंभीरपने नामगज करीत आहेत ।।2।।
हत्तीचा कळप जसा डोलत असावा , त्याप्रमाणे एकाहुन एक श्रेष्ठ असे विष्णुभक्त आनंदाने डोलत आहेत ।।3।।
श्रीहरिच्या नामामृताच्या घोषत भक्तसमुदाय कोंडाटूंन गेला आहे आणि अश्या प्रकारे हे विष्णुदासांचे सैन्य आलेले पाहुन कलिकाळालाही कंप सुटला आहे ।।4।।
पंढरीतिल वाळवंटामधील हे सुख पाहुन ब्रह्माधिकहि त्याची इच्छया करीत आहेत, हां मृत्युलोक धन्य आहे, येथील लोक भाग्यवंत आहेत, असे ते म्हणतात ।।5।।काशीत मरण आलेतर मुक्ति मिळते, गया वर्जन केल्याने पितृवृनातून मुक्तता मिळते, पंधारीत विठ्ठालाच्या चरणापाशि मात्र अशी उपाधी नसते ।।6।।
तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला चिंता करण्याचे कारण काय? सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमची कधीही अपेक्षा करणार नाही ।।7।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा