मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३४२अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक

गाथा अभंग ३४२

अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥

आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥

देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥

देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥

हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥

तुका म्हणे होसी भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥

अर्थ :- अन्नाच्या वासाने जर पोट भरले असते तर स्वयंपाक करण्याचे कारणाच् काय होते ।।1।।

नुसत्या शब्दाने कधी प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही; त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेंन्यासाठी रामाचे सतत स्मरण करा ।।ध्रु।।

पानी फक्त पाहुन जर कोणाची तहान भागत असेल तर पाण्याचा साठा का करावा ? ।।2।।

वृक्षाची सावली दुरुण पाहुन त्याचा अनुभव घेता येत नाही, त्याखाली बसावे लागते ।।3।।

तसे हरिनाम प्रत्यक्ष गावे, एकावे लागते, त्यावर दृढ़ भाव ठेवावा लागतो ।।4।।

तुकोबा म्हणतात, तू जर दृढ़ भावाने हरिभक्ती केलीस तर तू निश्चितच मुक्त होशील ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा