गौळणी
गाथा अभंग ४०२
तंव तो हरि म्हणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो ।
मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥
पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करीं स्थिर बुद्धि वो ।
तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुद्धि वो ॥ध्रु.॥
कोठें तरी दुनियांत वर्तलें वो । स्त्रियांनीं भ्रतारा दानां दिलें वो ।
कैसा भला मी नव्हे तें सोसिलें वो । रुसतेसी तूं उफराटें नवल जालें वो ॥२॥
काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वें आणविलें हनुमंतासि वो ।
कष्टी केलें मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु म्हणे खरें खोटें नव्हे यासि वो ॥३॥
अर्थ :- सत्यभामेचे हे बोलने एकूण भगवंत म्हणाले, प्रिये, आशा अटू शब्दांचा भडिमार माझ्यावर का करतेस? माझ्याकडे दूसरे कोणी असेल तर-देवच जाने ! असे धारदार शब्द तू का वापरतेस ? ।।1।।
तू आपल्या मनाला अगोदर विचारुन पहा, आणि देहभ्रांति टाकून आपली बुद्धि स्थिर कर. आजपर्यंत तुझे माझे हा जो वाद तू घातलास, ती सर्व उपाधि आहे. आता तरी विवेकाची दृष्टी ठेव. भानावर ये ।।ध्रु।।
पत्नीने पतीला दान दिल ऐसा प्रकार जगात कधीतरी, कोठे तरी झाला आहे काय? कधीही न घडणारी गोष्ट् तू केलिस , तरी मी ती सहन केलि. मग मी किती चांगला आहे, सांग बरे! असे असून, तूच रुसतेस हे खरच मोठे आश्चर्य आहे ।।2।।
मी तुझी कशी व कोणती फजीती केलि ते सांग. तुझा अभिमान घालविन्यासाठी मी हनुमंताला आणले. त्या प्रसंगी हनुमंत व गरुड़ यांचा तंटा झाला. गरुडाला किती दुःख झाले! मला राम व्हावे लागले. रुक्मीणीला सीता व्हावे लागले. ते किती कष्टाच होते! तुकाराम बंधू म्हणतात याला खऱ्या- खोत्याचा काही विचारच नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा