गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

३८९गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी

गौळणी

गाथा अभंग ३८९

गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें ।

जाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥

सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ध्रु.॥

आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ।

आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥२॥

आम्ही येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें ।

बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरूनी करी मात कांहीं ॥३॥

वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं ।

जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी जाऊं पाहे तियेचें ॥४॥

तया हाती सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या । कृष्णमळिणीं मिळाल्या त्याही न फिरती ।

तुका म्हणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजि ॥५॥

अर्थ :- गौळणी दही,दूध घेऊन बाजाराला निघाल्या तेव्हा श्रीकृष्ण त्याना आडवा आला. पदराला धरून म्हणाला, आधी कर भारा मगच पुढे जा. त्या म्हणाल्या, अरे बाजूला हो, आम्हाला जाउदे. आम्हाला प्रथमच भेटलास. आमच्या संचित करमाला अडथळा आनलास. त्या मुळे आता जन्म मृत्यूची एरझार संपली ।।ध्रु।।

कृष्णने दुसरीच्या पदराला हिसका दिला. त्या वेळी इतर गौळणी आपला पदर त्याच्या हातून सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत म्हणालाया, " तू वेदा झाला आहेस के? आज पर्यन्त आम्ही कितीतरी वेला इकडून गेलो, परंतु इथला कर घेणारा अधिकारी काळा की गोरा, तेहि आम्हाला माहीत नाही. आणि आज तू इथला कर् वसूली अधिकारी झालास काय? खोट बोलने शोभातेका तुला? ।।2।।

कृष्णदेव त्याना म्हणाले, आम्ही या वातेचे अधिकारी आहोत या पूर्वी तुम्ही क्र भरला नाहीत म्हणजे आमच्याशि लबाड़ी केलि. त्या वर गौळण हसून म्हणाल्या आम्ही सासुरवाशिं आहोत. आमाचा पदर का ओढतोस? दुरुणाच् काय बोलावे ते बोल ।।3।।

घकरच्याना जर तू आमचा पदर ओढतोस हे काळाले तर, तुझे नि आमचे काही खरे नाही. हे ऐकल्यावर श्रीहरिणे त्यांच्या अंतकरणात प्रवेश केला व तो त्यांना कोठेही जाउ देईन. त्यांचे मर्मस्तान त्याने आपल्याकडे आकृष्ट करून घेतले ।।4।।

तुकाराम महाराज महानता, अश्या रीतीने श्रीहरिच्या तावादित सापडल्यामुळे त्यांचा जन्म मृत्युचा बाजार चूकला. त्या कृष्ण स्वरूपा तद्द्रुप झाल्या. पुन्हा संसाराकडे त्या वळल्या नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गौळणींनो, तुम्ही उगीच खंत करू नका तुमचे जैसे संचित होते तसे ते सफल झाले ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा