गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

३९६गाई गोपाळ यमुनेचे तटीं

गौळणी

गाथा अभंग ३९६

गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेटी ।

चेंडू चौगुणा खेळती वाळवंटीं । चला चला म्हणती पाहूं दृष्टी वो ॥१॥

ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी ।

मिस पाणियाचें करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परीं वो ॥ध्रु.॥

चिरें चोळिया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती ।

कोणा नाठवे कोण कुळ याती । जालीं ताटस्त सकळ नेत्रपातीं वो ॥२॥

दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात ।

करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥३॥

अर्थ :- जगजेठी श्रीकृष्ण गाई व गोपाळांसह यमुनेतिरि पानी पिण्यासाठी आला; त्यानंतर सवंगडी वाटून वळवंटात चारि दिशांनी चेंडूचा खेळ खेळू लागले. त्या वेळी श्रीकृष्णला पाहन्याच्या ओढिनि गौळणी म्हणाल्या, "चला आपण तिकडे हरिला पाहू" ।।1।।

त्या गोपिका कामातुर झाल्या होत्या. हरिच्या दर्शनासाठी त्यांचे चित्त कासाविस झाले होते. पाणी आनंयाच्या किंवा धुनें धुन्याच्या निमित्ताने बाहेर पडायचे, असे बारा-सोळा गौळणींनि ठरवून ठेवलेले होते. ।।ध्रु।।

परंतु पानी भरने, धुनें धुनें ही कामे त्या पूर्णपणे विसरून गेल्या. त्यांचे लक्ष् कृष्णकडे लागलेले होते. आपले कुळ, गोत्र, जात, कुटुंब या कशाचेच त्या कुणाल भान उरले नव्हते. कृष्णकडे पाहताना सार्यांची दृष्टी तटस्थ झाली ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, काही गुळणींना दांत घासन्यासाठी तोंडात हात घातला होता., तो तसाच राहिला. त्या वेळी दूर वाद्यांचा आवाज येत होता. लोकांचा गलबलाही चालला होता; परंतु त्यांना काहीही एकु येत नव्हते. श्रीहरिच्या मुखातून येणारे वेणु गीत एकन्यामध्ये त्यांचे कान तल्लीन झाले होते. तुकाराम महाराज म्हणतात, की याप्रमाने माझा स्वामी सार्यांचे मनोरथ पूर्ण करीत होता ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा