गौळणी
गाथा अभंग ४००
कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥
देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥
तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥
अर्थ :- एक गौळण हरिच्या लावन्यरूपाला भुलली. बाजारात दूध विकायला गेली अस्ता 'दूध घ्या' असे म्हणन्या एवजी 'हरी घ्या' असे म्हणू लागली. ।।1।।
हरिचे रूप तिने डोळयाने पाहिले . तिच्या ध्यानी मनी तेच ठसले होते. म्हणूनच ती 'हरी घ्या' असे म्हणू लागली होती ।।ध्रु।।
स्वताच्या स्थितिचा तिला विसर पडला आणि गोविंदाच्या रूपाच्या-गुणांच्या वर्णनात तल्लीन झाली ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, बाजारातील अभक्त तिला भघुन हसत होते, परंतु तिचे कान त्यांच्याकडे नव्हते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा