गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

४००कोणी एकी भुलली नारी

गौळणी

गाथा अभंग ४००

कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥

देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥

आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥

तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥

अर्थ :- एक गौळण हरिच्या लावन्यरूपाला भुलली. बाजारात दूध विकायला गेली अस्ता 'दूध घ्या' असे म्हणन्या एवजी 'हरी घ्या' असे म्हणू लागली.  ।।1।।

हरिचे रूप तिने डोळयाने पाहिले . तिच्या ध्यानी मनी तेच ठसले होते. म्हणूनच ती 'हरी घ्या' असे म्हणू लागली होती ।।ध्रु।।

स्वताच्या स्थितिचा तिला विसर पडला आणि गोविंदाच्या रूपाच्या-गुणांच्या वर्णनात तल्लीन झाली ।।2।।

तुकाराम माहाराज म्हणतात, बाजारातील अभक्त तिला भघुन हसत होते, परंतु तिचे कान त्यांच्याकडे नव्हते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा