गौळणी
गाथा अभंग ३९८
गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥
वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥
परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥२॥
तुकयाच्या स्वामीसवें जाली भेटी । तेव्हां जाली तुटी मागिल्यांची ॥३॥
अर्थ :- हे सखे, हरीचा भोग घेण्यात खुपच गोडवा आहे; परंतु तो कसा आहे, हे मात्र वानीतून वर्णन करता येत नाही. मी त्या हरीला प्रेमाने मीठी मारून बसले आहे ।।1।।
श्रीरंगाने माझे आणत:करण वेधुन टाकले आहे. त्यामुळे देह व देहसंबंधीचे ममत्व नाहीस झाले आहे ।।ध्रु।।
हरिच्या रूपावर जदलेली दृष्टी काही केल्या माघारी फिरत नाही. माझे मन समाधान पावून त्याच्या चरणी स्थिर झाले आहे ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, गौळनिंचि माझ्या स्वामिशी भेट झाली की त्याच्या मागील संसाराचा संबंध नाहिसा होतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा