गौळणी
गाथा अभंग ४०१
करूनी आइत सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे ।
न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥१॥
सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे ।
बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥
मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे ।
मागुती रुद्रासि भेटी दिली तई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी रे ॥२॥
भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे ।
नष्टा क्रिया नाहीं मां तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसाल्या रे ॥३॥
अर्थ :- श्रीकृष्णच्या स्वागताची सर्व तैयारी करुण सत्यभामा आपल्या महलात त्याची वाट पाहत होती. साड़ी रात्र संपूण गेली तरी भगवंत महालात आलेच नाहीत. कामातुर चित्ताने ती उदासीन पने पडून राहिली; इतक्यात भगवंताने दाराला धक्का दिला ।।1।।
तेव्हा सत्यभामा म्हणाली, 'देवा, दूर व्हा. तुमच्या मनातील भाव मला कळाला. तुम्ही आपले काम साधुन घेण्यापुरते प्रेमाचे प्रदर्शन करता. तुम्ही जे काही बोलता, ते नाटकि आहे. तुम्ही मुद्दामच उजाडताना आला आहात ।।ध्रु।।
परंतु याचा दोष मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही कसे आहात हे मला काळाले नाही म्हणून मीच वेडी ठरले आहे. नारदाला तुमचे दान दिल्याने काएची विटंबना झाली. पुन्हा रुद्राला (हनुमंताला) भेट दिली, तेव्हा माझी किती फजीती झाली ते लक्षात असूनही मी तुमच्या वचनावर विश्वास ठेवला नाही काय ? ।।2।।
तुम्ही फार चांगले आहात, असे मी मानत होते. आजपर्यंत माझा हां गैरसमज होता. तो आज दूर झाला आहे. बोलल्याप्रमाने तुम्ही वागत नाहीत, म्हणून तुम्ही दृष्ट आहात. तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी अगम्य, लबाड़ असून मोठा कुशल आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा