शेजारातीचे अभंग
गाथा अभंग ४६८
तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥
कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥
टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥
प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥
अर्थ :- हे रखुमाई, तुम्ही विठ्ठलाला आमच्या संधार्भात काहीतरी सांगा ॥१॥
जे काही उषाठांना त्यांच्याकडे उरले असेल तर ते तात्काळ आम्हाला द्यावे, असे सांगा ॥ध्रु.॥
एकतरी घास मिळावा अशी अपेक्षा धरून मी बसलो आहे ॥२॥
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विनंती केल्याबरोबर रुक्मिमी मातेने आम्हाला ब्रह्मरसाचे रुचक भोजन दिले. आता फक्त ‘विट्ठल-विट्ठल’ म्हणू ॥३॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा